Saturday, June 16, 2007

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.
माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

Thursday, June 14, 2007

पंढरीची वारी (आषाढी यात्रा) .....

स्वत: पांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगताना म्हटले आहे, ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मास' म्हणून संबोधिला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादि कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. या सर्वात मोठया यात्रेसाठी दरवर्षी संतांच्या पालख्यांसमवेत व अन्य मार्गाने सुमारे 5 ते 6 लाख लोक पंढरीत येत असतात. पंढरीचा आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो. चंद्रभागा नदी यात्राकाळात दुथडी भरुन वहात असते. आल्हाददायक वातावरण झालेले असते. वारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात. आषाढ शुध्द दशमीला अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होते. हजारो लोक पालखीला सामोरे जातात. साधु-संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अनिर्वचनीय असतो. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होतात. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
या यात्रेपूर्वी ठरलेल्या मुहूर्तावर आळंदी, देहू, पैठण, शेगाव इ. संत सत्पुरुषांच्या गावाहून त्या त्या संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूरास येतात.
आषाढ शु. 9 ला भंडीशेगाव येथे रिंगण होऊन सर्वजण वाखरी येथील संतनगरात मुक्कामास येतात. दशमीच्या दिवशी सकल संतांच्या पालख्यांसमोर दिंडयांचे रिंगण होते. रिंगण-सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो, संतांचा अश्व वर्तुळाकार नाचत असतो, धावत असतो व त्यामागे वारकरी धावत असतात. रिंगण-सोहळा संपल्यावर सर्व पालख्या पंढरपूराकडे निघतात.
वाखरी येथून सर्व पालख्यांच्या शेवटी निघणारी पालखी श्रीज्ञानेश्वर महाराजांची. या पालखीचा प्रथम क्रमांक असतो. दुसरा क्रमांक देहूच्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असतो. तिसरा क्रमांक पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालकीचा. चौथी पालखी निवृत्तिनाथ महाराजांची, पाचवी सोपानदेवाची, सहावी एदलाबादहून आलेली संत मुक्ताबाईची पालखी आणि सातवी पालखी पंढरपुराहून संतांच्या पालख्यांना सामोरे जाऊन पंढरीस आणणारी श्रीनामदेवरायांची पालखी. या प्रमुख संतांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतात. संतनगर (वाखरी येथील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येण्याच्या ठिकाणा) हून आषाढ शुध्द दशमीला सकाळी 10 च्या सुमारास एकेक पालखी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमणा करु लागते. पंढरपुरात सर्वात शेवटी येणारी पालखी असते. श्रीज्ञानेश्वर महाराजांची; ती रात्री 10-11 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील प्रदक्षिणा रोडवरील श्रीज्ञानेश्वर मंदिरात येते. अन्य संतांच्या पालख्या आपापल्या मंदिरात जातात. आषाढ शुध्द एकादशीला यात्रेकरु चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करुन शुचिर्भूत होतात. कपाळी गोपीचंदन व बुवक्याची नाममुद्रा लावतात. गळयात तुळशीची माळ व टाळ, खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत नामघोष करीत, क्षेत्र-प्रदक्षिणा करतात. श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. दर्शन बारीत 8-10 तास उभे राहून लोक 'श्री'चे दर्शन घेऊन कुतार्थ होतात. वारी पूर्ण करतात. दुपारी 2 च्या दरम्यान श्रीविठ्ठलाचा रथ क्षेत्र-प्रदक्षिणेसाठी निघतो. माहेश्वरी धर्मशाळेत (पूर्वीचा खाजगीवाले वाडा) श्रीविठ्ठल-रुक्मिणी व राही यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. या मूताअना सोन्याचे पाणी दिले ाहे. सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गावरुन रथारुढ श्रीविठ्ठल-रुक्मिणी-राहीच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. ज्या भाविकांना एकादशीचे दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही, त्या भाविकांना रथारुढ श्रीविठ्ठलाचे दर्शन होते, समाधान मिळते. हा रथ भक्तभाविक ओढत असतात. रथापुढे श्रीगजानन महाराज संस्थानचा हत्ती झुलत असतो. 'श्री'च्या दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर लोकांची झुंबड उडते. लोक रथावर खारीक, बुक्का, लाह्या, पैसे उधळतात. ठिकठिकाणी रथ थांबवतात. परंपरेनुसार मानकरी लोक 'श्री'ची पूजा करतात रथाची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो. आनंद होतो. ही परंपरा (प्रथा) सुरु होऊन सुमारे 190 वर्षे झाली आहेत.
आषाढ शुध्द पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. क्षेत्राच्या दक्षिणेस सुमारे 1 ते 1॥ कि.मी अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून दिंडया, पालख्यांची गर्दी होते. दुपारी 10 ते 12 च्या सुमारास तिथे कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला एकमेकांना वाटता जातो. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. एकमेकांच्या मुखात लाह्यांचा दहीकाला घालून नामस्मरणी दंग असलेले वारकरी 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला' असे म्हणत उपाउरी भेट घेतात. ''पंढरीच्या लोक नाही अभिमान । पाया पडती जन एकमेका ॥'' या संतवाणीप्रमाणे एकमेकाला वंदन करतात. सान-थोर, उच्च-नीच भेद संपतो. सर्व भाविक, वैष्णव हा आनंद-सोहळा साजरा करुन, 'पंढरीची वारी' परिपूर्ण झाल्याच्या आनंदात आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात. पंढरीत यात्रेसाठी येताना आणि यात्रा पूर्ण झाल्यावर गावी परत जाताना जागोजागी मुक्काम करुन नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, भारुडाचे कार्यक्रम करुन हरिजागर करीत असतात. पालखी सोहळयातील विणेकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, घोडेस्वार इत्यादि बाबतींतली संपूर्ण व्यवस्था संस्थानच्या मार्गदर्शनाखाली पाहिली जाते. या व्यवस्थेत आवश्यकतेनुसार होणारे बदल आळंदी देवस्थान पंचकमिटी, वारकरी महामंडळ व जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार केले जातात. दिंडया व पालखी परती मार्ग, याचे नियम याच पध्दतीने ठरविले जातात. अलीकडे पालखीसमवेत येणा-या यात्रेकरुंच्या दिंडयांच्या संख्येत वाढ होत आहे.
आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दुसरे दिवशी 'महाद्वार काला' होतो. प्राचीन काळी पंढरपुरात कान्ह्या हरिदास नावाचे श्रीविठ्ठलाचे अनन्यभक्त होऊन गेले. रोज पहाटे काकड आरतीला. मंदिरात भजने, पदे, आरत्या म्हणून ते सेवा करीत असत. ( आजही त्यांचे वशंज ही प्रथा पाळून रोज श्रीविठ्ठलांचे पुढे गायनसेवा करीत असतात) श्रीविठ्ठलाचे प्रसन्न होऊन त्यांना स्वत:च्या पादुका दिल्या अशी आख्यायिका आहे. श्रविठ्ठलमंदिराजवळ हरिदास वेशीकडे जाताना श्री. हरिदास यांचा स्वत:च्या मालकीचा वाडा आहे. त्याला ' काल्याचा वाडा' म्हणतात. या वाडयात श्रीविठ्ठलाच्या याच चांदीच्या पादुका आहेत. आषाढ व कार्तिक यात्रेच्या पौर्णिमेच्या दुसरे दिवशी या पादुका वै.कान्ह्या हरिदासाचे वंशजांच्या मस्तकावर बांधल्या जातात. या पादुका त्यांच्या मस्तकी ठेवण्याचा मान संत नामदेवरायांच्या वंशजाकडे आहे. पादुका मस्तकी ठेवताच श्री. हरिदासांची शुध्द हरपते. ते समाधी अवस्थेत जातात. नंतर टाळमृदुंगाच्या नादघोषात व नामघोषात मिरवणुकीने श्री. हरिदासांना खांद्यावर घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात जातात. मंदिरातील सभामंडपात काला खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा केल्या जातात. दहीहंडी फोडली जाते. ही मिरवणूक (काला) महाद्वारातून निघतो. जाताना पादुकींवर गुलाल, बुक्का, हळद, कुंकू व लाह्यांचा वर्षाव होतो. महाद्वार घाटाने ही मिरवणूक खाली चंद्रभागेच्या भेटीसाठी जाते. पवित्र जल उडवले जाते. तेथून कुंभार घाटाने मिरवणूक माहेश्वरी धर्मशाळेत जाते. तेथून रामायणे गेटवरुन मुक्ताबाईच्या मठावरुन हरिदासवेशीतून पुन्हा वाडयात येते. मार्गात हरिनामाचा गजर व अबीर-गुलालाची उधळण होते. दहीहंडया फोडल्या जातात. भाविक लोक श्रीविठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेतात. काला वाडयात आल्यावर महाआरती होते. सर्वांना काला वाटला जातो. महाप्रसाद होतो आणि यात्रेची या सोहळयाने परिपूर्णता-सांगता होते.
आषाढी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळाला 'चातुर्मास' म्हणतात. या चातुर्मासात मठातून, मंदिरांतून फड, वाडयातून श्रीविठ्ठलोपासना ( भजने, प्रवचने, कीर्तने, पारायणे, भारुडे इ. च्या माध्यमातून) केली जाते.
प्रमुख संतांच्या पालख्यांशिवाय अन्य अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरात आषाढी यात्रेसाठी येत असतात.
श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात.


- डाँ. अरुण शं वाडेकर

Tuesday, June 12, 2007

पंढरपुरात साकारणार भव्य आध्यात्मिक प्रकल्प...

चंद्रभागा नदीच्या पैलतीरापासून नामदेव पायरीपर्यंत सुंदर कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप...या मंडपात दोन्ही बाजूंना उंच ओव-या...नदीच्या दोन्ही तीरावर नऊ-नऊ असे अठरा घाट...त्यांना गीतेतील अठरा अध्यायांची नावे...असा भव्यदिव्य प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी - देहू परिसर विकास समितीचे मुख्य प्रवर्तक वि. दा. कराड, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर प्रयत्नशील आहेत. .........हा प्रकल्प स्थानिक पालिका प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून लवकरच पंढरपुरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरची वाटचाल आता ज्ञान तीर्थक्षेत्राकडे सुरू झाली. विकास समितीच्या संकल्पनेनुसार आळंदी, देहूनंतर पंढरपूरचा असा विकास करण्याचे नियोजन १९८६ मध्ये झाले होते. त्यानुसार आता लवकरच हा प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी गतिशील प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पानुसार चंद्रभागा नदीच्या पैलतिरापासून नामदेव पायरीपर्यंत कोणाचेही घर, मठ अथवा दुकान न पाडता सुंदर व कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप उभारण्यात येणार आहे. मंडपात पहाटेपासून रात्रीपर्यंत सुंदर अभंग व नादमधुर संगीत ऐकविण्यात येतील. नदीच्या दोन्ही तीरावर सर्व घाटांना विविध संतांची नावे देण्यात येतील. घाटाच्या दोन्ही बाजूला १२० फूट रुंदीचे रस्ते कुणाचेही घर, मठ न पाडता तयार करण्यात येतील. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना २०-२० फुटांचे फुटपाथ व मधोमध ८० फुटांचा रस्ता असेल. या रस्त्याच्या भूयारात भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि मुताऱ्या बांधण्यात येतील. यामुळे पवित्र चंद्रभागा नदी आणि वाळवंटातील घाणीची समस्या थोडीफार कमी होण्यास मदत होईल. तसेच या रस्त्यावर गोमुखाद्वारे चंद्रभागा नदीचे तीर्थ देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाबाबत बोलताना श्री. कराड म्हणाले, ""जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या प्रकल्पासाठी बौद्धिक योगदान दिले आहे. आता स्थानिक केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी मंजुरीची आवश्‍यकता आहे. हे धार्मिक नव्हे तर सामाजिक काम आहे. यातून अनेकांचे आरोग्य चांगले राहून कल्याण होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे.''

- संजय पाठक (सकाळ वृत्तसेवा )

Monday, June 11, 2007

मंदिरातील सेवाधारी...

'श्री'च्या मंदिरात नित्योपचार करणारे सेवेकरी आहेत. अनेक वर्षांपासून हे सर्व सेवाधारी भक्तीयुक्त अंत:करणाने 'श्री'च्या चरणाची सेवा करीत असतात.
1) पुजारी : काकडआरती ते शेजारती व नित्योपचारातील 'श्री'ची पुजा करणारे ते पुजारी.
2) बेणारे : नित्योपचारातील मंत्र सांगणारे ते बेणारे. यांनी सांगितलेल्या मंत्रांप्रमाणे सर्व पुजाविधी केले जातात.
3) परिचारक : पूजेच्या वेळी चांदीच्या घागरीत गरम पाणी आणून देणे, धूप-दीप चांदीच्या घुपटण्यातून पुजाऱ्याकडे देण्याचे काम परिचारक करतात.
4) डिंगरे : 'श्री'ना आरसा दाखविण्याचे काम डिंगरे करतात.
5) डांगे : देवाचे चोपदार आहेत. हातात चांदीची काठी घेऊन पूजेच्या वेळी बंदोबस्ताचे काम डांगे यांच्याकडे असते.
6) हरिदास : 'श्री'च्या पुढे काकडआरती व महापूजेच्या वेळी गायन करणे व 'श्री'च्या रथापुढे पंचपदी म्हणण्याचे काम हरिदास करतात. हे कान्ह्या हरिदासाचे वंशज आहेत.
7) दिवटे : हे 'श्री'ची पूजा सुरु असताना हाती दिवा घेऊन सर्वांना 'श्री'चे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उभे असतात.
8) बडवे : हे विश्वस्त आहेत. परिवार देवतांची पूजा-अर्चा इ. कार्य हेच करीत असतात.
9) उत्पात : श्रीरुक्मिणीमातेची सर्व सेवा उत्पात मंडळीच करीत असतात.

श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात....

श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन सोळखांबीत येऊन दक्षिणेकडील दरवाजाने बाहरे पडताच अनुक्रमे अंबाबाई (नारदमुनी, परशुराम, आता या मूर्ती मुक्ती मंडपात बसवल्या आहेत. ) उजव्या सोंडेच्या गणपती यांचे दर्शन घडते. पुढे तरटी दरवाजाच्या आत पायऱ्यांजवळ संत कान्होपात्रा समाधिस्थान आहे. कान्होपात्रा नायकीण होती. तिने विठ्ठलभक्ती केली आणि विठ्ठलाने तिला आपलेसे केले, अशी आख्यायिका आहे. समाधीवर तरटीचे झाड आहे. तसेच पढे गेल्यावर भगवान व्यंकटेशाचे छोटे मंदिर आहे. ही अतिशय सुंदर, चतुर्भुज मूर्ती गंडकी शिळेची आहे. ''व्यंकटरमणा गोविंदा'' अशी आरोळी ठोकून भक्तजन व्यंकटेशाच्या चरणी माथा टेकवतात. त्याला उजवे घालून जाताना डाव्या बाजूच्या भिंतीत श्रीगणेशाची मूर्ती दिसते. व्यंकटेशाला प्रदक्षिणा घालून खाली उतरताना बाजीराव पडसाळी (ओवरी) लागते. या सभामंडपात विविध कार्यक्रम सदैव होत असतात. तसेच याच मंडपात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे रोज सकाळी मोफत खिचडी, ताक व बुंदीच्या लाडूच्याा प्रसादाचे वाटप केले जाते. त्याला लागूनच श्रीमहालक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात अन्नपूर्णेची मूर्ती आहे व एक खांबावर नृसिंहाची मूर्ती आहे.
बाजीरावाच्या ओवरीत रामेश्वर, खंडोबा, गणपती, नागोबा व श्रीकृष्ण यांच्या छोटया सुरेख मूर्ती आहेत. तिथून पुढे जाताना डाव्या हाताला पश्चिमद्वार आहे. पुढे नवग्रहाचे मंदिर आहे. हा भाग श्रीविठ्ठलाच्या गर्भगारामागे येतो. इथेच एक बाजूस श्रीदत्त, सूर्य व चिंतामणी यांच्या मूर्ती आहेत. याच्या पुढे गेल्यावर श्रीरुक्मिणीमातेचे मंदिर लागते.