Wednesday, October 28, 2009

कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी चार लाख भाविक दाखल....


कार्तिकी प्रबोधनी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत आज चार लाखाहून अधिक वारकरी दाखल झाले आहे। शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सायंकाळी पंढऱीत दाखल झाले असून गुरुवारी पहाटे महापूजा होणार आहे। शहर आणि परिसर हरिनामाचा गजरात दुमदुमला आहे।
कार्तिकी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आंधप्रदेश, कर्नाटक येथून भाविक दाखल झाले आहेत। सप्टेंबर अखेर आणि आँक्टोबर पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीची कामे सुरु आहे। त्यामुळे कोकण, कर्नाटक भागातून येणा-या भाविकांची संख्या कमी आहे। चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची गर्दी झाली आहे। येथे टाकण्यात आलेल्या राहुट्यांमधून किर्तन, भजन, प्रवचनाबरोबरच हरिनामाचा गजर सुरु आहे। श्री। विठ्ठलाच्या पदर्शन रांगेत ३० ते ४० हजार भाविक आहेत। दर्शनासाठी १२ ते १४ तासांचा कालावधी लागत आहे। दर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम आणि त्यांचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत। दर्शनरांगेत स्वच्छता ठेवण्यासाठी नगराध्यक्ष सतीश मुळे, मुख्याधिकारी मंगेश चितळे लक्ष देत आहेत।

Thursday, July 2, 2009

वैराग्याचे वैभव- विठ्ठलपंत...

आपेगाव गोविंदपंत कुलकर्ण्यांचे अत्यंत बुद्धिमान पण वैराग्यशील पुत्र विठ्ठपंत बालवयातच तीर्थयात्रेला निघाले होते। बुद्धीच्या तेजाने त्यांचा चेहरा उजळून निघालेला होता। लहान वयातच शास्त्रग्रंथांचे वाचन झालेले होते

Sunday, June 14, 2009

'विठ्ठल भेटला भेटला'

येत्या सोमवारी देहूचा आणि मंगळवारी आळंदीचा देऊळवाडा टाळमृदुंगांच्या आवाजाने दुमदुमून जाईल... आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली मुक्काम सोडतील.. आणि अवघा महाराष्ट्र तनाने नाही तर किमान मनाने तरी त्यांच्या सोबत चालू लागेल... गेल्या सातशे वर्षाहून अधिक काळ हा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी ना कुणाला आमंत्रणाची गरज ना मानपानाची... शेतातल्या पेरण्या आवरून भाबडा वारकरी पंढरीच्या वाटेला लागेल... मग त्याला उन्हाची तमा नसेल की पावसाची भीती... लक्षलक्ष पावले पंढरीची वाट चालू लागतील आणि ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात सारा महाराष्ट्र भारावून जाईल. डोळ्याचे पारणे फिटावे असा हा सोहळा. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला देहूहून तर अष्टमीला आळंदीहून सुरू होणारा... आषाढी एकादशीला वारी पंढरीला पोहचत असली तरी सारा सोहळा आषाढ पौणिर्मेच्या काल्यापर्यंत जवळपास महिनाभर चालतो. हा सोहळा अनुभवावा असे अनेकांना मनापासून वाटत असले तरी प्रत्येकाला जाणे शक्य नसते. अशा अनेकांसाठी पीटीआयचे फोटोग्राफर शिरीष शेटे यांनी हा हृदयस्पर्शी 'अनुभव' आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे. वारीतील उत्कट क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या फोटोंचे 'वारी-पाथ टू द डिव्हाईन' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतचे विविध टप्पे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामधून टिपले आहेत. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलरखुमाईचे आणि ज्ञानोबा-तुकारामांचे मंदिरातील श्रीमूर्तींचे त्यांनी काढलेले अप्रतिम फोटो या पुस्तकात आहेत. प्रत्येक फोटोची इंग्रजीतून दिलेली माहिती आणि त्याला दिलेल्या अभंगाच्या जोडीमुळे हे पुस्तक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर वाचकांपर्यंत जाण्यास सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक पाहिल्यावर वारीला न गेलेल्याही माणसाची अवस्था 'विठ्ठल भेटला भेटला' अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
- महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १५ जून २००९

Friday, January 30, 2009

तुकारामांचे अभंग आणि साहित्य आता इतर भाषांमध्येही...

मराठी संत मांदियाळीतील एक प्रमुख संत तुकाराम यांची अभंयगाथा आता संस्कृत, मराठी आणि

Sunday, January 4, 2009

राज्यातील जनतेच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल चरणी प्रार्थना....

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट देऊन सपत्नीक श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा केली. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो, असे साकडे त्यांनी यावेळी श्री विठ्ठल चरणी घातले. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शहरात येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याकामाला गती देण्यासाठी पंढरपूर शहरासाठी वेगळे प्राधिकरण निर्माण करुन तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास केला जाईल.राज्यातील चाळीस लाख शेतकर्‍यांना ६ हजार २०८ कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय आघाडी शासनाने विचारपूर्वक घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री जयवंत आवळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रविवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. सुधाकरपंत परिचारिक आदी उपस्थित होते.