Saturday, June 9, 2007

श्रीविठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव....

परब्रह्म पांडुरंगाचे बडवे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा-अर्चा, उत्सव-महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सेवाभावी वृत्तीने करीत असताना. नित्य पंचक्वान्नाचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी-साखर इ. नित्यप्रती भक्तिभावाने दाखविला जातो. आरती-धूपारतीनंतर 'श्री'ची दृष्ट काढली जाते. या श्रीविठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव-महोत्सव होत असतात.
1) चैत्र मासात नववर्षारंभी शु. प्रतिपदेला (गुढी पाडव्याचे दिवशी) 'श्री'च्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज-उभारणी होते. भागवत धर्माची ध्वजा डौलाने फडकू लागते. 'श्री'स अलंकार घातले जातात. चैत्र शु. प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यत ( अंदाजे 7 जूनपर्यंत) 'श्री'स नित्य चंदनाची सुंगधी उटी लावण्यात येते. शिरा व वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शु. प्रतिपदेपासून पौणिमेपर्यंत असतो. चैत्र शु. एकादशीला फराळाबरोबरच पुरणाचा महानैवेद्य असतो. श्रीरामनवमीचा उत्सव मंदिरात होतो. हरिदासी कीर्तन असते. पौर्णिमेस हनुमानजयंती उत्सव असतो.
(2) वैशाख महिन्यात 'श्री'स चंदनाची सुंगधी उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोषाख केलेले असतात. रुक्मिणी माता व श्रीव्यंकटेशालादेखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेस अलंकार घालतात. महानैवेद्यात आमरस असतो. वैशाख शु. 14 स नृसिंह जयंती उत्सव मंदिरात होतो. चैत्रगौरीनिमित्त श्रीलक्ष्मीमाता व रुक्मिणीमातेस अलंकार पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा व ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
(3) ज्येष्ठ मासात मृगनक्षत्र मृगनक्षत्र निघेपर्यंत चंदनाची उची असते. थंड पाणी व फराळाचे पदार्थ 'श्री'स दाखवतात.
(4) आषाढ महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून सकलसंतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ शु. 5 च्या सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. 'श्री'चे दर्शन अहोरात्र चालू असते. आषाढ शु. एकादशीस 'श्री'चा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वार काला होतो. यात्रेनंतर शुभमुहूर्तावर प्रक्षाळपूजा होते. रुद्र व पवयान सूक्ताचा अभिषेक होतो. साखरेने देवास चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे व उत्पात पाणी उधळतात. देवास अलंकार व भरजरी पोषाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरु होतात. प्रक्षाळपूजेदिवशी शेजारतीनंतर 'श्री'स सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरु होतो. मंदिरात व पंढरपुरातील मठ. मंदिर व धर्मशाळेतून परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रम अखंडपणे चालू होतात. आषाढ वद्य 13 ला नामदेव पुण्यतिथीचे दिवशी नामदेव समाधी (पायरी) ची महापूजा व सुंदर आरास केली जाते. भजन-कीर्तनादि कार्यक्रम होतात. काल्याने याची सांगता होते.
(5) श्रावण मासात शुध्द पंचमीला रुक्मिणी व पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरीपूजनासाठी नगरी व पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. सायंकाळी मिरवणुकीने वाजत-गाजत भीमानंदीमध्ये गौरी विसर्जन केले जाते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. श्रावणी पौर्णिमेस विठ्ठल-रुक्मिणी व परिवार देवतांना अलंकार घालतात. वद्यात बाजीराव पडसाळीत गोकुळ अष्टमी ( कृष्णाजन्म सोहळा) उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या वेळी संतांची कीर्तने, भजने व प्रवचने होतात. शेवटी काल्याचा प्रसाद होऊन दिंडी निघते.
6) भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतीचा उत्सव होतो. दोन्हीकडे श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कार्यक्रम होतात व मिरवणुकीने 'श्री'चे विसर्जन केले जाते. याच महिन्यात शुध्द 10 ते 15 पर्यंत मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7) आश्विन शुध्द प्रतिपदेपासून श्रीरुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरु होतो. रात्री 'श्री'चा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर 'श्री'ची पालखी निघते. आश्विन शु. पौर्णिमेस या महोत्सवाची सांगता होते. आश्विन वद्य प्रतिपदेला बांधलेबुवांच्या ओवरीत गीता अभ्यास मंडळाचा वर्धापन दिवस उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न होतो.
8) कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
9) मार्गशीर्ष मासात भक्तगण हाती दिवटया घेऊन, मुखाने ''येळकोट-येळकोट'' घे, असे म्हणत श्रीखंडोबाच्या मंदिरात येतात. भंडारा उधळतात. दर्शन घेतात. शुध्द एकादशीला गीताजयंती गीता-पारायणाने साजरी केली जाते. पौर्णिमेस दत्तजयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्रीविठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागानदीच्या पात्रात, गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही गोपद्म व 'श्री'चे उमटलेले चरण, वाजवलेल्या मुरलीचे दर्शन होते. आळंदीतून आल्यावर भगवंत इथेच एक महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर 'श्री' च्या दर्शनासाठी येतात. स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष अमावास्येला इथे रुद्राभिषेक होतो व पुन्हा देव रथात बसून मंदिरात येतात.
10) पौष मासातील अमावास्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासांचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात, गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पीतांबर नेसवून, सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. ''पांडुरंग, पांडुरंग'' असा जयघोष करीत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांत धनुर्मास येतो. या धनुर्मासात 'श्री'ना खिचडीचा नैवेध असतो. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून असंख्य महिला वाणवसा करण्यासाठी व देवदर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.
11) माघ महिन्यातील शुध्द पंचमीला वसंतोत्सव सुरु होतो. वसंतपंचमीला मंदिरात तिळगुळाचे भजन होत असते. देवास पांढरा शुभ्र पोषाख केला जातो. पागोटे बांधले जाते व 'श्री'वर गुलालाची उधळण केली जाते. चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरु झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत-गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. माध शु. 13 औसा संस्थानच्या पीठाधिपतींचे मंदिराच्या सभामंडपात चक्रीभजन होते. हा सोहळा पाडण्यासारखा असतो. मंदिर भक्तांनी तुडुंब भरले. महाशिवरात्रीला श्रीमंत होळकर संस्थानच्या वतीने रात्री 'श्री' सं गंगास्नान घालून महापूजा केली जाते. याच महिन्यात श्रीविठ्ठलाचे परमभक्त वै. प्रल्हादबुवा बडवे महाराजांची पुण्यतिथी सभामंडपात समाधिस्थळावर मोठया भक्तिभावाने साजरी केली जाते. भजन, प्रवचन, कीर्तन व संगीताचे व्याख्यानांचे कार्यक्रम बडवे समाजाच्या वतीने केले जातात.
12) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस महाद्वार घाटावर व रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात, रंगपंचमीच्या दिवशी देवाचा डफ निघतो. रंगांची उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोटया मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या व इतर लावण्या गावून श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.
असे आहेत श्रीविठ्ठलांच्या मंदिरी प्रतिवर्षी मोठया भक्तिभावाने संपन्न होणारे महोत्सव..

श्रीविठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव....

परब्रह्म पांडुरंगाचे बडवे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा-अर्चा, उत्सव-महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सेवाभावी वृत्तीने करीत असताना. नित्य पंचक्वान्नाचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी-साखर इ. नित्यप्रती भक्तिभावाने दाखविला जातो. आरती-धूपारतीनंतर 'श्री'ची दृष्ट काढली जाते. या श्रीविठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव-महोत्सव होत असतात.
1) चैत्र मासात नववर्षारंभी शु. प्रतिपदेला (गुढी पाडव्याचे दिवशी) 'श्री'च्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज-उभारणी होते. भागवत धर्माची ध्वजा डौलाने फडकू लागते. 'श्री'स अलंकार घातले जातात. चैत्र शु. प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यत ( अंदाजे 7 जूनपर्यंत) 'श्री'स नित्य चंदनाची सुंगधी उटी लावण्यात येते. शिरा व वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शु. प्रतिपदेपासून पौणिमेपर्यंत असतो. चैत्र शु. एकादशीला फराळाबरोबरच पुरणाचा महानैवेद्य असतो. श्रीरामनवमीचा उत्सव मंदिरात होतो. हरिदासी कीर्तन असते. पौर्णिमेस हनुमानजयंती उत्सव असतो.
(2) वैशाख महिन्यात 'श्री'स चंदनाची सुंगधी उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोषाख केलेले असतात. रुक्मिणी माता व श्रीव्यंकटेशालादेखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेस अलंकार घालतात. महानैवेद्यात आमरस असतो. वैशाख शु. 14 स नृसिंह जयंती उत्सव मंदिरात होतो. चैत्रगौरीनिमित्त श्रीलक्ष्मीमाता व रुक्मिणीमातेस अलंकार पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा व ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
(3) ज्येष्ठ मासात मृगनक्षत्र मृगनक्षत्र निघेपर्यंत चंदनाची उची असते. थंड पाणी व फराळाचे पदार्थ 'श्री'स दाखवतात.
(4) आषाढ महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून सकलसंतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ शु. 5 च्या सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. 'श्री'चे दर्शन अहोरात्र चालू असते. आषाढ शु. एकादशीस 'श्री'चा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वार काला होतो. यात्रेनंतर शुभमुहूर्तावर प्रक्षाळपूजा होते. रुद्र व पवयान सूक्ताचा अभिषेक होतो. साखरेने देवास चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे व उत्पात पाणी उधळतात. देवास अलंकार व भरजरी पोषाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरु होतात. प्रक्षाळपूजेदिवशी शेजारतीनंतर 'श्री'स सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरु होतो. मंदिरात व पंढरपुरातील मठ. मंदिर व धर्मशाळेतून परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रम अखंडपणे चालू होतात. आषाढ वद्य 13 ला नामदेव पुण्यतिथीचे दिवशी नामदेव समाधी (पायरी) ची महापूजा व सुंदर आरास केली जाते. भजन-कीर्तनादि कार्यक्रम होतात. काल्याने याची सांगता होते.
(5) श्रावण मासात शुध्द पंचमीला रुक्मिणी व पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरीपूजनासाठी नगरी व पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. सायंकाळी मिरवणुकीने वाजत-गाजत भीमानंदीमध्ये गौरी विसर्जन केले जाते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. श्रावणी पौर्णिमेस विठ्ठल-रुक्मिणी व परिवार देवतांना अलंकार घालतात. वद्यात बाजीराव पडसाळीत गोकुळ अष्टमी ( कृष्णाजन्म सोहळा) उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या वेळी संतांची कीर्तने, भजने व प्रवचने होतात. शेवटी काल्याचा प्रसाद होऊन दिंडी निघते.
6) भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतीचा उत्सव होतो. दोन्हीकडे श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कार्यक्रम होतात व मिरवणुकीने 'श्री'चे विसर्जन केले जाते. याच महिन्यात शुध्द 10 ते 15 पर्यंत मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7) आश्विन शुध्द प्रतिपदेपासून श्रीरुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरु होतो. रात्री 'श्री'चा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर 'श्री'ची पालखी निघते. आश्विन शु. पौर्णिमेस या महोत्सवाची सांगता होते. आश्विन वद्य प्रतिपदेला बांधलेबुवांच्या ओवरीत गीता अभ्यास मंडळाचा वर्धापन दिवस उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न होतो.
8) कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
9) मार्गशीर्ष मासात भक्तगण हाती दिवटया घेऊन, मुखाने ''येळकोट-येळकोट'' घे, असे म्हणत श्रीखंडोबाच्या मंदिरात येतात. भंडारा उधळतात. दर्शन घेतात. शुध्द एकादशीला गीताजयंती गीता-पारायणाने साजरी केली जाते. पौर्णिमेस दत्तजयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्रीविठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागानदीच्या पात्रात, गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही गोपद्म व 'श्री'चे उमटलेले चरण, वाजवलेल्या मुरलीचे दर्शन होते. आळंदीतून आल्यावर भगवंत इथेच एक महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर 'श्री' च्या दर्शनासाठी येतात. स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष अमावास्येला इथे रुद्राभिषेक होतो व पुन्हा देव रथात बसून मंदिरात येतात.
10) पौष मासातील अमावास्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासांचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात, गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पीतांबर नेसवून, सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. ''पांडुरंग, पांडुरंग'' असा जयघोष करीत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांत धनुर्मास येतो. या धनुर्मासात 'श्री'ना खिचडीचा नैवेध असतो. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून असंख्य महिला वाणवसा करण्यासाठी व देवदर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.
11) माघ महिन्यातील शुध्द पंचमीला वसंतोत्सव सुरु होतो. वसंतपंचमीला मंदिरात तिळगुळाचे भजन होत असते. देवास पांढरा शुभ्र पोषाख केला जातो. पागोटे बांधले जाते व 'श्री'वर गुलालाची उधळण केली जाते. चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरु झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत-गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. माध शु. 13 औसा संस्थानच्या पीठाधिपतींचे मंदिराच्या सभामंडपात चक्रीभजन होते. हा सोहळा पाडण्यासारखा असतो. मंदिर भक्तांनी तुडुंब भरले. महाशिवरात्रीला श्रीमंत होळकर संस्थानच्या वतीने रात्री 'श्री' सं गंगास्नान घालून महापूजा केली जाते. याच महिन्यात श्रीविठ्ठलाचे परमभक्त वै. प्रल्हादबुवा बडवे महाराजांची पुण्यतिथी सभामंडपात समाधिस्थळावर मोठया भक्तिभावाने साजरी केली जाते. भजन, प्रवचन, कीर्तन व संगीताचे व्याख्यानांचे कार्यक्रम बडवे समाजाच्या वतीने केले जातात.
12) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस महाद्वार घाटावर व रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात, रंगपंचमीच्या दिवशी देवाचा डफ निघतो. रंगांची उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोटया मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या व इतर लावण्या गावून श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.
असे आहेत श्रीविठ्ठलांच्या मंदिरी प्रतिवर्षी मोठया भक्तिभावाने संपन्न होणारे महोत्सव..

Wednesday, June 6, 2007

भक्त पुंडलिक मंदिर...

भक्तराज पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. मंदिरासमोरच 20-25 फुटांवर लोहदंड तीर्थ आहे. या तीर्थात दगडी नाव तरते असे म्हणतात. पुंडलिक मंदिराची उंची 65 फूट आहे. व रुंदी 63 फूट आहे. मंदिराचे शिखर अत्यंत कलात्मक व आकर्षक आहे. हे प्राचीन मंदिर चांगदेवाने बांधले अशी आख्यायिका आहे. पेशव्यांचे सरदार भाटे यांनी या मंदिराचा जीर्णाद्वार केला. मंदिरामध्ये छोटा सभामंडप असून आतील बाजूस गर्भगार आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. शिंवलिंगावर पुंडलिकाच्या पितळी चल मुखवटा आहे. या देवस्थानचे पुजारी कोळी आहेत. ते पुंडलिकाच्या मुखवट्यावर टोप घालून, नामम्रुदा लावून पुजा करतात. या ठिकाणी पहाटेपासून रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार - कडकडआरती, महापूजा, महानैवेद्य, धूपारती, शेजारती इ. करतात. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव होतो. येथील सर्व उपचार समस्त कोळी समाजाच्या वतीने केले जातात. नदीस पूर आल्यावर पुंडलिकाचा चल मुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेवून तिथे नित्योपचार केले जातात.
असेही म्हणतात, भक्तराज पुंडलिक कर्नाटकी ब्राह्मण होता. म्हैसूरजवळ 45 कि.मी. अंतरावर असलेल्या 'मेलकोटे' गावात कल्याण तीर्थाजवळ पुंडलिकाचे घर होते. कर्नाटकात पुंडलिकास पुंडलिक म्हणतात. तो कृष्णभक्त होता. मेलकोटे गावातील रंगशिळेवर कोरलेल्या चित्रातून पुंडलिकांचे दर्शन घडते. उंच भक्कम शरीरयष्टी, डोक्यावर कानटोपी, गळ्यात जानवे, कंबरेला धोतर, गळ्यात वीणा, हाती चिपळ्या अशी ही भजनरंगी तल्लीन झालेली पुंडलिकाची मूर्ती आहे. त्याच्या आईचे नाव मुक्ताबाई व वडिलांचे नाव जानूदेव अथवा जन्हूदेव होते. कुक्कुटस्वामींच्या आश्रमात घडलेल्या प्रसंगावर पुंडलिकाने मातृ-पितृसेवा केली आणि तुकाराम महाराज म्हणतात - " पुंडलिकाच्या भावार्था । गोकुळीहूनि जाला येता ।"
काही संशोधकांच्या मते, पुंडलिक मंदिर पुंडलिकेश्वर (शिवाचे मंदिर आहे. तर बहुसंख्य विद्वानांचे मत आहे की हे भक्त पुंडलिकाचेच मंदिर आहे.

श्रीरुक्मिणी मंदिर...

श्रीरुक्मिणी मंदिरात जाताना पाय-या चढून वर गेल्यावर राही व सत्यभामा यांची छोटी मंदिरे आहेत. या मूर्ती सुंदर, सुबक आहेत. शेजारीच रुक्मिणी मंदिराचा गाभारा लागतो. या मंदिराचे मुख्य गाभारा, मध्य गृह, मुख्य मंडप व सभामंडप असे चार भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील बाजूस एक खोली आहे. हे रुक्मिणीमातेचे शेजघर आहे. शेजघराचे दरवाजे चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहेत. यात चांदीचा पलंग गाद्या, गिरद्या व मखमली बिछाना आहे.
गाभा-यात उंच चौथरा आहे. त्यावर अत्यंत रेखीव श्रीरुक्मिणीमातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हाक कटीवर आहेत. नित्येपचारानंतर देवीला सौभाग्यालंकार घालून, वस्त्रे नेसवून सजवितात, ठसठशीत कुंकवाचा मळवट भरतात. अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्रीरुक्मिणी मातेची काळ्या गुळगुळीत दगडाची मूर्ती पाहताच भाविकभक्त 'आईसाहेब' 'मातोश्री' असे म्हणून भक्तियुक्त अंत:करणाने तिचे दर्शन घेतात. कंठ दाटून येतो. मातोश्रींची कृपा अखंडपणे लाभावी यासाठी भक्तजन तिची करुणा भाकतात व धन्य होतात.
मातोश्रींचे दर्शन घेऊन बाहेर येताच तीर्थप्राशन करुन उजवीकडून मंदिराच्या मागे जाता येते. तिथून लोक कळसाचे दर्शन घेतात आणि गोपुर दरवाजाच्या आत असलेल्या रुक्मिणी मदिराचा सभामंडपात अलीकडेच लाल पत्थरापासून अत्यंत कलात्मक पद्धतीने बनविलेला आहे. या मंडपामध्ये श्री रुक्मिणी स्वयंवरातील प्रमुख प्रसंगांची सुंदर, भव्य चित्रे पहावयास मिळतात. श्रीरुक्मिणी मातेचे सुंदर भव्य चित्र मन आकर्षून घेते. इथे एक दीपमाळ आहे.
या मंडपात नवरात्रौत्सवात 15 दिवस अऩेकानेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. चातुर्मासात श्रीमद् भागवतपुराण, प्रवचने, कीर्तने होत असतात. नवरात्रौत्सव हा श्रीरुक्मिणीमातेचा प्रमुख उत्सव, या काळात रोज मातेला विविध प्रकारजी पूजा बांधली जाते. सुवर्णालंकार घातले जातात. वसंत पंचमीला 'श्री' सह मंडपात सर्वत्र सुगंधी फुलांच्या माळांची आकर्षक अशी सजावट केली जाते.
श्रीरुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन वर येताच एक ओवरी लागते. या ओवरीतील खोल्यांतून अनुक्रमे काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण-सीता, काळभैरव, रामेश्वर लिंग, दत्त व नृसिंह या लहान पण सुंदर मूर्तीचे दर्शन घडते. ओवरी संपताच सोळखांबीत प्रवेश करण्याचा एक दरवाजा आहे. त्यालगतच लक्षचौ-यांशी देवीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीखाली भिंतीत एक प्राचीन शिलालेख आहे. हा शके 1995 मधील शिलालेख असून यात मंदिराच्या जीर्णीद्धारासाठी देणगी देणारांची नावे आहेत. भक्तमंडळी इथे पाठ घासतात. इथे पाठ घासली की चौ-यांशी लक्ष जन्मांचा फेरा चुकतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. खरेतर हा शिलालेख इतिहास-संशोधनाचे एक साधन आहे. पण श्रद्धाळू लोकांशी पाळ घासून घासून शिलालेख पुसट केला आहे. आता त्या शिलालेखावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे.
दर्शनार्थी भक्त लोक सर्व देवतांचे दर्शन घेऊन पुनश्च श्रीविठ्ठालाच्या दर्शनासाठी इथे सोळखांबीत येतात. या सोळखांबी मंडपाला पूर्वाभिमूख 3, दक्षिणेकडे 2 व उत्तरेकडील बाजूस 2 असे 6 दरवाजे आहेत. सावळ्या विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन त्याचे राजस सुकुमार रुप मनी-मानसी साठवून ठेवतात. पुन्हा विठ्ठलभेटची आस मनी बाळगून बाहेर निघतात. उजव्या बाजूस आणखी एक महत्त्वाचा शिलालेख पहावयास मिळतो.
श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भक्तजन महाद्वारी येतात. महाद्वारातून नदीकडे जाताना डाव्या बाजूस श्रीकाळभैरवनाथ, श्रीशनैश्वर, श्रीशाकंबरी देवी व पुढे श्रीखंडोबाची छोटी मंदिरे लागतात. या मंदिरासमोरच नव्याने बांधलेले श्रीसंत नरहरी सोनाराचे मंदिर आहे. तेथील व्यवस्था समस्त सोनार समाज पाहतो. या मंदिराच्या मागे फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. जवळच श्रीमल्लिकार्जुनाचे सुंदर हेमाडंपती मंदिर आहे. प्रसिद्ध संत नरहरी सोनार याच शिवलिंगाची पूजा करीत असत. इथे जवळच त्यांचे घर व दुकान होते. नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते. पुढे त्यांना श्रीविठ्ठलाच्या कृपेने श्रीविठ्ठलाच्या मूर्तीत भगवान शंकराचे दर्शन झाल. नरहरी अद्वैतावस्थी झाले. शैव व वैष्णव संप्रदाय एक झाले. या भेटीची खूण म्हणूनच श्रीविठ्ठलाचे मस्तकी शिवलिंग आहे असे म्हणतात. या महाद्वाराच पूर्वी फार मोठी वेस होती. रस्तारुंदीकरणात ती पाडली गेली. वेशीशेजारी असलेले अकरा रुद मारुती मंदिर रस्त्यालगत पुनश्च जसेच्या तसे वसवले आहे. मारुतीपुढे नंदी आहे.

Tuesday, June 5, 2007

भागवत धर्म व वारकरी संप्रदाय...

वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. वारकरी लोक ज्या आचरणप्रणालीचे पालन करतात, ज्यामध्ये श्रीविठ्ठलभक्ती प्रमुख आहे त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि श्री संत तुकाराम महाराजांनी या धर्ममंदिरावर कळस चढवला म्हणूनच वारकरी पंथाचा नित्यस्मरणी महामंत्र आहे - 'ज्ञानोबा तुकाराम'.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्नीतेवर सर्वजनसुलभ असे प्राकृत भाषेत भाष्य लिहिले. ही ज्ञानेश्वरी हे मराठी वाड्मयातील अनुपम लेणे आहे. भागवतधर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. भारतातील भीष्मपर्वात असलेली गीता संस्कृतमध्ये आहे. कुरुक्षेत्रावर महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचा सदुपदेश केला. त्याच गीतेतील 18 अध्यायांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून भाष्य लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ज्ञानेश्वरीनंतर भागवत धर्मांचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतसत्पुरुषांनी रचले. त्यापैकी नाथ भागवत, रामायण, नामदेवगाथा, तुकाराम गाथा इ. प्रमुख आहेत.
श्री ज्ञानेश्वर व नामदेव महाराजांच्या पूर्वकाळातही विठ्ठल संप्रदाय अस्तित्वात होता यास काही विद्वानांनी शैव संप्रदाय मानले आहे. ज्ञानेश्वर माऊलीनी भागवत धर्म किंवा विठ्ठल संप्रदायाला साधेसोपे स्वरुप देण्याचे महान कार्य केले. त्यांनी समाजातील सर्व वर्णांच्या लोकांना भक्तीची द्वारे खुली केली, सर्व जातीच्या, भाषेच्या, वर्णांच्या लोकांना 'भागवत धर्म' सहजसुलभ केला आहे. या संप्रदायाची आचारसंहिता बनविली. म्हणूनच " ज्ञानदेवे रचला पाया। उभारिले देवालया" असे म्हणतात.
संत तुकाराम महाराजांनी अभंग-संकीर्तनातून संसारातील कर्मे करीत विठ्ठलाचे नाम घेण्याचा उपदेश केला. संत जनाबाईने कर्मपूजा करता करता ईश भजावा हे सूत्र कष्टकरी जनतेला सांगितले. कोणतेही तीर्थव्रत न करता पंढरीची वारी करावी, हा संतानी जनतेला संदेश दिला आणि भक्तभाविकांनी तो आत्मसात केला. भागवत धर्मांचे बहुसंख्य अनुयायी ग्रामीण भागात राहतात. त्यांची श्रीविठ्ठल ही एकमेव देवता आहे. वारकरी पंथ, विठ्ठल पंथ, वैष्णवधर्म किंवा भागवत धर्म या सर्वांच्या शब्दांच्या मागे ही एकच कल्पना साकार आहे. ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे गुरु व बंधु श्री निवृतिनाथ महाराज यांच्यापासून हा संप्रदाय सुरु झाला. तुकाराम एकनाथ, नामदेव, जनाबाई इ. अनेकानेक संतांनी या संप्रदायाचा प्रसार केला. या परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय मानले जातात.
महाराष्ट्रातील सर्व संत स्वत:ला विष्णुभक्त किंवा वैष्णव म्हणवितात. शिव आणि विष्णु एकच प्रतिमा आहे असा अनुभव संत नरहरि सोनारांना आला. तोच अनुभव निळोबारायांनाही 'ऐक्यरुपे हरिहर । उभा कटीवर विटेवरी' या शब्दातून व्यक्त केला. समर्थ रामदासांना सावळ्या विठ्ठलाच्या ठिकाणी भगवान शंकर आणि प्रभु रामचंद्राचे दर्शन झाले. श्रीविठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, म्हणून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे लोक श्रीविठ्ठलोपासना करतात. निवृत्तिनाथ, सोपानदेव, विसोबा खेचर इ. संत नाथपंथातील अनुग्रहित शैव होते. श्री. ज्ञानदेवांच्या पूर्वजांनीही नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता. काही इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे शैवक्षेत्र होते. जेव्हा ज्ञानदेवादि चार भावंडे पंढरीस आली तेव्हा वारकरी संप्रदायाची लोकप्रियता पाहून त्यांनी या पंथाचा स्वीकार केला असेही मानले जाते. अशा प्रकारे पंढरपूर क्षेत्र समन्वयाचे तीर्थक्षेत्र आहे, तर भागवत धर्म हे वैदिक धर्मांचे सार आहे. वेद, उपनिदे, गीता, भागवत यांची थोरवी सकल संतांनी अभंगातून गायिली आहे.
वारकरी संप्रदाय हा ज्ञानोत्तर भक्तीचा संप्रदाय आहे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी श्रवण करणे, विठ्ठलाचे अखंड चिंतन करणे हे या संप्रदायाचे मुख्य कर्तव्यकर्म, आचरण, पण हे सर्व संत वेदांती अथवा निष्कि्य नव्हते तर त्यांनी समाजाला सकि्य भक्तीचा मार्ग दाखविला. महाराष्ट्राचा हा भागवत धर्म विश्वव्यापी आहे. महाराष्ट्रातील नामदेवाही संतांनी तीर्थयात्रा करीत असताना भारतातील अन्य प्रदेशातून विठ्ठभक्तीचा प्रचार व प्रसार केला. गुरुग्रंथसाहेबमध्ये नामदेवांच्या प्राप्त होणा-या रचना याची साक्ष देतात.

भजन...

विठ्ठल विसावा सुखाची साऊल...
विठ्ठल विसावा सुखाची साऊली, प्रेम पान्हा घाली भक्तावती ॥धृ॥
दाखवी चरण दाखवी चरण, दाखवी चरण नारायणा ।
विठ्ठल आचार विठ्ठल विचार दावी निरंतर पाय आता ।
नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, धावोनीया धरी हाती मज ।

जनी नामयाची रंगली कीर्तनी...
जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घेई ॥धृ॥
मुखी हरीनाम नैत्र पैलतीरी देवाची पंढरी मोक्षवाटे-मोक्षवाटे ॥१॥
दळीता कांडीता वाहता कावडी कीर्तनात गोडी विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या ॥२॥
चक्र टाकोनीया दळावे हरीने, भक्ताचे देवानी दास व्हावे दास व्हावे ॥३॥
जळो तुझे नाते जळो गर्व हेवा, तुझी आस देवा पांडुरंगा पांडुरंगा ॥ जनी ॥४॥

विठू माझा लेकुरवाळा , सं...
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा ।
निवृत्ती हा खांद्या वरी सोपाना हात धरी ।
पुढे चाले ज्ञानेश्‍वर, मागे मुक्ताबाई ही सुंदर गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।
बंका कडीयेवरी, नामा करांगुळी धरी ।
जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहाळा ॥

Monday, June 4, 2007

विठोबाच्या अन्य काही मूर्ती...

अहोबलम् (आंध्र प्रदेश) येथे असलेली विठ्ठलमूर्ती कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभी आहे. हिच्या हातात शंख आणि कमलनाल आहेत. मस्तकावर उंच, टोपीवजा नक्षीदार मुकुट आहे. ही मूर्ती पंढरपूर येथे सध्या आसलेल्या विठ्ठलमूर्तीपेक्षा खूपच जुनी असावी असे मत आहे. मुंबईतील जोगेश्वरी गुहेत आढळणारी एक भग्न मूर्ती विठ्ठलाची असावी, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे. ह्या मूर्तीचे मस्तक, हात आणि गुडघ्यापासूनचा खालचा भाग नाहीसा झाला आहे, परंतु गळ्यात मोत्यांचा कंठा आणि कमरेस मेखला दिसते. मूर्तीचे धोतर गुडघ्यापर्यंत आलेले आहे. डाव्या मांडीवर धोतराच्या सुरकुत्या दिसतात., तसेच मेखलेचा लोबंता परदही दिसतो. पोकळीत बोटे घातलेला शंखही आहे. मेखलेचे एक टोक उजव्या मांडीवर आहे. गळ्यातल्या कंठ्याच्या फिती पाठीवर दिसतात. छातीच्या उजव्या भागावर लांब व कुरळ्या केसांची एक बट दिसते. ही मूर्ती आठव्या शतकाच्या उत्तरार्धातली असावी, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे.
मुंबइर्च्या पिन्स आँफ वेल्स म्यूझियममध्ये घारापुरीच्या लेण्यांतून आणलेली एक उभी मूर्तीही विठ्ठलाची असण्याची शक्यता वाटते. ही मूर्तीही भग्नावस्थेत आहे. हिच्या कमरेच्या वरचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. कमरेस वस्त्र, वर मेखला, डाव्या मांडीवर टेकलेला व पोकळीत डाव्या हाताची बोटे असलेला शंख हे सर्व स्पष्ट दिसते; पण ह्या मूर्तीच्या उजव्या बाजूस एक उभी स्त्री व डाव्या बाजूस उभा, बुटका आणि लठ्ठ असा गण आहे. ही मूर्ती आठव्या शतकाच्या दुस-या पावक्यातील असावी, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे.
कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्ळी येथे, तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्न केशवाच्या मंदिरात, बसरुल (जि. मंड्या) येथील मल्लिकार्जूनमंदिरात आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे विठ्ठलमूर्ती आहेत. बेल्लारी जिल्ह्यातील हंपी येथील विरुपाक्षमंदिरातही विठ्ठलमूर्ती आहे.
तामिळनाडूत श्रीरंगम् (जि.तिरुचिरापल्ली) येथील रंगनाथमंदिरात तंजावर येथील विष्णुमंदिरात विठ्ठलमूर्ती असून ती श्रीदेवीभूदेवीसह आहे. हैदराबाद येथे एका खाजगी संग्रहात विठ्ठलाची एक सुबक मूर्ती आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आणि नेवाशाजवळ टाकळीमान म्हणून असलेल्या एका गावी एका मंदिरात चतुर्भुज विठ्ठल आढळतो. हे मंदिर यादवकालीन आहे, असे मत सुरेश जोशी ह्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. टाकळीभान येथील विठ्ठलमूर्तीचे वैशिष्टय म्हणजे ह्या मूर्तीला मिशा कोरलेल्या आहेत. चांदीचे डोळे बसविले आहेत. मस्तकावर शाळुंकेसह शिवलिंग स्पष्टपणे कोरलेले आहे. येथे विठ्ठलाला चार हात आहेत. ह्या मूर्तीची शैली लोकशिल्पाची आहे. आज उपलब्ध असलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती पाहिल्या, तर त्या कधी दोन हात, तर कधी चार हात असलेल्या आहेत. काही विष्णूच्या रुपात आहेत, तर काही गोपाळकृष्णाच्या रुपात आहेत. मूर्तीच्या हाती कधी शंख-चक्र, तर कधी शंख-पद्म आहे. कधी शंख-वरदमुद्रा, तर कधी शंख अभयमुद्रा आहे. चौकोनी पादपीठावर वा विटेवर उभ्या असलेल्या मूर्ती आहेत; पण कमलफुलात पाय घोट्यांच्या वरपर्यंत झाकलेली मूर्तीही आढळते. कमरेवर हात असणे हे मात्र सर्व मूर्तींना समान असे लक्षण आहे. कोणत्याही मूर्तिलक्षणग्रंथाचा विठ्ठल हा विषय झालेला नाही, मात्र दक्षिणेतील अनेक प्राचीन विठ्ठलमूर्ती ह्या स्कांद पांडुरंगमाहात्म्यात वर्णन केलेल्या विठ्ठलमूर्तीशी ब-याच संवादी आहेत, असे डाँ.ढेरे ह्यांनी नमूद केले आहे.