Saturday, June 16, 2007

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

No comments: