Friday, January 30, 2009

तुकारामांचे अभंग आणि साहित्य आता इतर भाषांमध्येही...

मराठी संत मांदियाळीतील एक प्रमुख संत तुकाराम यांची अभंयगाथा आता संस्कृत, मराठी आणि

Sunday, January 4, 2009

राज्यातील जनतेच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल चरणी प्रार्थना....

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट देऊन सपत्नीक श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा केली. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो, असे साकडे त्यांनी यावेळी श्री विठ्ठल चरणी घातले. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शहरात येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याकामाला गती देण्यासाठी पंढरपूर शहरासाठी वेगळे प्राधिकरण निर्माण करुन तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास केला जाईल.राज्यातील चाळीस लाख शेतकर्‍यांना ६ हजार २०८ कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय आघाडी शासनाने विचारपूर्वक घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री जयवंत आवळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रविवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. सुधाकरपंत परिचारिक आदी उपस्थित होते.

Wednesday, November 12, 2008

स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 8 नोव्हेंबर 2008 रोजी 8.00 वाजता स्टार माझा चॅनलवर..

स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा मध्ये माझ्या ब्लाँगला तुतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले यांची विडिओ क्लीप...

Friday, October 31, 2008

कार्तिकी यात्रा - दिनांक 9 आँक्टोबर 2008 पासून सुरु होत आहे.

दिनांक ९ नोव्हेंबर 2008 रोजी कार्तिक, पंढरपूर यात्रा.
दिनांक 23 नोव्हेंबर 2008 रोजी आंळदी यात्रा.
दिनांक 25 नोव्हेंबर 2008 रोजी ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव - आंळदी
कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

पा

चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/

चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/
पंढरीच्या आस प्रत्येक वारक-याच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होत असतात, दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. अशा 2008 रोजी झालेल्या वारीचे वर्णन वाचण्यासाठी ई सकाळचे शंकर टेमघरे यांनी त्यांच्या http://viththal.blogspot.com/ ब्लाँग चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. चे वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर वारीतील दिवसभराचा दिनक्रम उभा राहतो.

Tuesday, October 14, 2008

'स्टार माझा' चे आभार...

'स्टार माझा' चे आभार... आणि प्रसन्न जोशी व अच्युत गोडबोले यांना धन्यवाद...
'स्टार माझा' ने मराठी ब्लाँग स्पर्धोसाठी तृतीय क्रमांकासाठी निवड दिनांक 11 आँक्टोबर 2008 'वेब माझा' या कार्यक्रमात करण्यात आली. आनंद वाटला. पंढरपूरविषयीच्या माहितीच्या ह्या ब्लाँगची आवर्जुन दखल घेतली. त्याबद्दल मी 'स्टार माझा' चे मन:पूर्वक आभार मानतो.
धन्यवाद
विश्वनाथ खांदारे

Tuesday, July 1, 2008

पांडूरंग: क्षेत्रनाम

लेखसंशोधनातील सुप्रसिध्द लेखक रा.चि.ढेरे यांनी त्यांच्या '' श्री विठ्ठल:एक महासमन्वय'' ह्या पुस्तकात पांडुरंग या नावाचे महत्व विविध लेखमीमांसाच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सांगतात की, स्कांद ' पांडुरंगमाहात्म्या' तही ' पांडुरंग' हे विठ्ठलाचे पर्यायनाम म्हणून आलेले असले, तरी मुळात ते क्षेत्राचे नाव होते. " पांडुरंग विठ्ठल" हे " काशी विश्वनाथ " यासारखे नाव होते. काशी विश्वनाथ म्हणजे काशीक्षेत्राचा विश्वनाथ असा होतो. हैदराबादमधील तिरूमलै पर्वतावर वेंकेटेशचे मंदिर उभारलेले आहे.मात्र तेथील भक्तांनी तिरूमलै वेंकेटेश असे नामकरण केले. याचा अर्थ असा होतो कि, पुढे-पुढे ही प्रथाचं रूजली गेली. त्या- त्या तीर्थस्थानावरून तेथील देवांचे पर्यायनाम ठरू लागले.पंढरपुर या क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंढरगे. विठ्ठलमंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर असलेल्या, होयसळ नृपती सोमेश्र्वराच्या लेखात (1159) या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या "पंडरगे"या 'पंडरगे' पासूनच 'पांडुरंग' हे देवनाम, पांडुरंग, पंढरपुर-पंढरी हे क्षेत्रनाम व पुंडरीक हे कृत्रिम संस्कृतीकरण करून साधले आहे आणि विठ्ठल या नामाची स्पष्टीकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहील्याचे सांगितले आहे.लोकप्रिय प्रचलित सामग्रीतूनचं माहात्म्यकथा रचली जात असते. असा दैवतशास्त्रज्ञांना वांरवांर सप्रमाण प्रत्यय येत आलेला आहे. विठ्ठलाची विकसनप्रक्रिया याच पध्दतीने घडत राहिली.या प्रक्रियेच्या पुढच्या-पुढच्या अवस्था आपल्याला मांडता येतात; पंरतू विठ्ठलाचे आदिरूप मात्र अजूनही आपल्या दृष्टीक्षेपात येऊ शकलेले नाही. त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी 'विठ्ठल' या नामाची निशं:क व्युत्पत्ती सापडयाला हवी. 'विठ्ठल-वीरप्पा' या नावाने नांदणारी धनगरांची विठ्ठलोपसना धांडोळायला हवी.विठ्ठल हा गवळी- धनगरांचा देव आहे.पदूबाई नावाच्या गवळणबाईचा हा पती आहे. ही वस्तूस्थिती ध्यानी घ्यायला हवीय. 'नग्ना' आणि 'मुक्तकेशी' होऊन विठ्ठलावर भाळलेली एक 'पद्मा' पांडुरंगमाहत्म्यात आलेली आहे. तिची विठ्ठलचरित्रातील उपस्थिती लक्षणीय आहे की नाही, ते तपासायला हवे.विठ्ठल आणि वेंकेटेश हे दोघेही विष्णूरूप आहेत. 'बालाजी' (बालकृष्ण) मानले आहे.या सर्व साम्यांचाही त्यांच्या मूलरूपाच्या शोधासाठी वापर करायला हवा. कृष्णरूप मानला गेलेला,कटीवर कर ठेवून उभा असलेला पश्र्चिम बिहारमधील अहिरांचा देव 'वीर कुवर' (वीर कुमार) याचा विठ्ठलाशी साम्यबंध लक्षणीय ठरेल काय़? हे गांभीर्याने ध्यानी घ्यायला हवे. विठ्ठल शोधाच्या या सर्व संभाव्य दिशा साक्षेपाने चोखळ्यानंतरच आपल्याला विठ्ठलाच्या मुलस्वरूपाविषयी काही सांगता येणे शक्य आहे.अजूनही 'विठ्ठल' या नावाची व्युत्पत्ती समाधानकारक रीत्या देता आलेली नाही. 'पांडुरंग' हे त्याचे दुसरे संतप्रिय नावं दृश्यत: शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूर-गौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक असल्यामुळे त्याची सावळ्या विठ्ठलाशी विसंवादी सांगड का घातली गेली,या प्रश्नाचे उत्तर देता आले ऩाही. 'विदा (ज्ञानेन),ठानू (अज्ञजनान्), लाति (गृहणाति), म्हणजे अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो.तो विठ्ठल होय. अशी 'विठ्ठल' या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करून देणारी एक व्युत्पत्ती पंरपरेत स्वीकारली गेली आहे.अथवा 'विदी' (ज्ञाने) स्थल:(स्थिर:) म्हणजे 'जो ज्ञानाच्या ठायी आहे तो विठ्ठल होय' ही अगदी कालपरवा पर्यंत सारस्वतव्याकरणाचा हवाला देऊन श्री.वि.कृ.श्रोत्रिय यांनी एक नवी व्युत्त्पती सादर केली आहे. इतिहासचार्य राजवाडे, डॉ.म.अ.मेहदळे,इत्यादी अनेक जुन्या-नव्या अभ्यासकांनी 'विठ्ठल' -नामाच्या व्युत्त्पतीचा प्रयत्न केला आहे.विष्टू-विठ्ठल अशा प्रक्रियेतून विष्णूपासून विठ्ठल हे नाम बनले, हे मत अनेक अभ्यासकांनी स्वीकारले आहे आणि त्याला विठ्ठलभक्तीच्या वैष्णव स्वरूपाची पुष्टीही लाभत राहीलेली आहे.महाराष्ट्रात विठ्ठलाप्रमाणेचं विठलाई या नावाच्या देवीची अनेक ठाणी आहेत.आजही त्या देवीचीं उपासना आदीम पातळीवर आहे.तिला उदात्त आणि उन्नत भक्तिविचारांचा स्पर्शही घडलेला नाही.विठ्ठल हे नाम जर विष्णूपासून व्युत्पादयाचे असेल, तर विठलाई या नावाचा उलगडा कसा करणार? तेव्हा हे उघड आहे की, विठ्ठल विष्णूरूप बनला आहे--विष्णूचा विठ्ठल झालेला नाही.वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, 'विठ्ठल' हे (विठू)चे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते 'विष्णू' हे विठ्ठल चे (विठू)चे उद्भ्रष्ट रूप आहे.कृत्रिम संस्कृतिकरण आहे.'विठ्ठल' या नावाचा स्पष्ट उलगडा अजूनही व्हायचा आहे.कदाचित या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलस्वरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे.असे ईतिहास संशोधक रा.चि. ढेरे ठामपणे सांगतात.ईतिहास संशोधक रा.चि.ढेरे यांच्या मते,श्रीविठ्ठलाच्या स्वरूपाचाच नव्हे, तर त्याच्या विलक्षण विकसनप्रक्रियेचा वेध घ्यायचा असेल तर विठ्ठलजिज्ञासूंनी शोधायच्या सा-या दिशा साक्षेपाने धांडोळायला हव्यात.विठ्ठलाचा सर्वांगीण शोध घ्यायला प्रवृत्त होताना जिज्ञासूंनी आपली ज्ञानाची शिदोरी समृध्द असल्याची खात्री करून घ्यायला हवी.विविध स्थळ-काळानुसार तसेच नानाविध संस्कृत ग्रंथातुन,संतकाव्यातुन विठ्ठलाची अनेक रूपे सामोरी येतात पंदेवातांचा शोध आणि देवाविषयक मानवी धारणांचा शोध ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबीं आहेत.ह्या दोन्ही बाबींची लक्ष्ये आणि साधनेही वेगळी आहेत.उपरोल्लिखित शोधवाटांचा विचार करता असे कळते की, एक वाट श्रध्देची तर दुसरी चिकित्सेची आहे.तसेच एका शोधाची वाट भावप्रधान तर दुसरी वाट बुध्दीप्रमाण आहे. उदाहरणार्थ म्हसोबा आणि विठोबा या दोन्ही देवांची भक्तांनी केलेली मनोभावना पहा.म्हसोबा देवाला कोंबड्या-बक-याचा नैवैद्य चालतो तर विठोबारायांचे भक्त किड्या-मुंग्यानाही जपतात.त्यामुळे देवसंकल्पना जपणा-या मानवी मुल्यांचा मागोवा घ्यायलाच हवा तरचं भावप्रधानता आणि बुध्दिप्राम्यणता यांतील खरे अंतर कळेल असेही संशोधक रा.चि.ढेरे म्हणतात.