Tuesday, July 1, 2008

शोध विठ्ठलाचा


विठ्ठल हे वारक-यांचे जग. वारक-यांचा आत्मा आणि त्यांच्या जगण्याचा मार्ग झालेला आहे. एकविसाव्या शतकात तर हा HRD चा शोधविषय ठरलेला आहे. महाराष्ट्राची संत-पंरपरा ही विठ्ठलमय युग म्हणुनच ओळखली जाते. ह्या युगाचा विठ्ठल हा कर्ता कसा झाला? तो आला कुठून? हे आणि यासम अनेक प्रश्न उपस्थित केले जावू लागले आणि यातूनचं विठ्ठलाचा शोध सुरू झाला. आजचा जो पंढरपूरचा परिसर आहे तो पूर्वी भांडरंग वट्टीग म्हणून ओळखला जायचा. भीमा आणि चंद्रभागा या दोन नद्यांच्या मधोमध हा भांडरंग परिसर होता.त्यामुळे ह्या परिसरात गाळाची व पांढरीची भरपूर जमिन होती. ह्या जमिनीत चिंच,आंबा,वड तसेच पिंपळ आदी मोठ्या वृक्षांची घनदाट झाडी होती. यामुळे या परिसरात घनदाट सावली,थंडगार वहाते नदीचे पाणी व गुरांच्या चा-याची विपुलता अधिक होती.यास्तव इथे गुरे,ढोरे, मेंढरे व त्यामागे हिंडणा-या गोपजंनाचा आणि धनगरांचा सतत वावर होता.त्याकाळात किंवा त्याहीअगोदर म्हणजे महाभारताच्या काळापासून या भागात गोधनासाठी हल्ले, दरोडे,मारामा-या तसेच लहान-सहान लढायादेखील होत हो्त्या. अशाच एका लढाईत येथे वावरणा-या एका गोपजनांच्या टोळीप्रमुखाने पराक्रम गाजवून दरोडेखोरांच्या टोळींचा कायमचा नायनाट केला.पंरतू दुदैवाने या लढाईत टोळीप्रमुख मारला गेला.त्याच्या अनुयायांनी त्याच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर मोठी,उभी शिळा उभारली.हीच स्मारकशिळा- स्मारकस्तंभ-किंवा त्याला लोकभाषेत भडखंभाही म्हटले जाते. पुढे हाच भडखंभा देव झाला.श्रद्धेने लोक त्याची पूजा करू लागले.त्याच्याकडे नवस फेडू लागले.त्याचा महीमा आजूबाजूस लोकांना समजू लागला.हळूहळू त्याच्याभोवती श्रद्धावान लोकांची गर्दी वाढू लागली.त्याच्या कृपाप्रसादासाठी लांबून-लांबून लोकं येवू लागली.ह्या भडखंब्यात गोपजनांनी धनगरी वेषात टोळीप्रमुखाची छबी कोरली आणि त्यानंतर तो आदिदेव झाला. या आदिदेवाचा पोषाख त्यांच्याच पोषखासारखा घडविलेला होता.पूजा-अर्चा यांचे फार अंवडबर नव्हते. मुर्तीच्या पायावर पाणी ओतावे,आसपासची रानटी फुले पायावर वहावी.कपाळी बुक्का लावला व मुर्तीच्या पायाला कवटाळून आपले दु:ख दैन्य सांगावे इतकेच घडे. मात्र यानंतर आपण सुखी होणार अशी त्यांची पक्की श्रद्धा होती. यानंतर पुजेचे हे प्रस्थ वाढले ते आजतगायत होय.आजच्या विठठ्लाचे रूप हेदेखिल वरील कथेशी मिळते-जुळते आहे. दुसरे असे की, पुराणांतील कथांनुसार पुंडलिकाने फेकलेल्या विटेंवर विठ्ठल य़ुगांनयुगे उभा आहे ही आख्यायिका, तर मग पुंडलिकाचा ईतिहास काय? तोदेखिल तपासणे हा शोधनिबंधाचाच भाग ठरेल.मुख्यत्वे श्री विठठ्ल आणि पंढरपूर या संबधात संशोधनाचे कार्य अनेक विचारवंतानी, जिज्ञासूंनी केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाचा देखिल आपणास विचार करणे गरजेचे आहे. 'बरवे बरवे पंढरपूर'पुस्तकाचे लेखक आबासाहेब भाटे यांच्या मते 'श्री विठ्ठल देवासंबधित अनेक कल्पना आहेत.महानुभाव पंथीयांच्या 'लीळाचरित्र' नावाच्या ग्रंथात श्री.चक्रधर स्वामींच्या मुखी या विठ्ठलासंबधी जी निंदाव्यंजक {प्रकरण saatave } घातली आहे; ती कथाही याच घटनेकडे बोट दर्शविते. त्या कथेतील पांडु हा ब्राम्हण, नेमा हा शिंपी व म्हाया {मूळ महादेव} हा कोळी यांनाच दरोडेखोर ठरवून, पांडुरंगाची,नामा शिंप्याची {नामदेवाची} निंदा केली व शेवटी बाप रखमा देवीवरू'' या वचनाचा उल्लेख करून श्री.ज्ञानेश्वर महाराजांचीही निंदाच केली. याही कथांतून केवळ विठठ्लाचे अस्तित्व कशाप्रकारे होते ते कळते.आता त्याचे नाव कुठुन आले? याचा शोध घेता असे समजते की, गोपजनांच्या ह्या देवाचे नाव त्यांच्या गावावरून दिले गेले असावे. कारण गावाचे नाव पंडूचे क्षेत्र-पंडरंगे-यावरून पांडूरंग असे नाव पडले. ईतिहासाची सांगड घालता असे दिसून .येते की, ईसवीसनाच्या दुस-या किंवा तिस-या शतकांत या आदिदेवाचे म्हणजे लोकदेवाचे श्रीकृष्णस्वरूप जनमानसात मूळ धरू लागले आणि ते चहूबाजूस पसरले. संस्कृत साहित्याचा अभ्यास करून विठठ्लाचा शोध घेण्या-यांमध्ये संशोधक ग.ह.खरे, रा.श.वाळींबे, शं.गो.तुळपुळे,डा.गुंथर सोथायमर,धनपलवार,दलरी, रा.चिं.ढेरे आदींचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. कारण यामुळे विठठ्लाची अनेक रूपे समोर आली आहेत. प्रख्यात शाहीर श्री.रामजोशीबुवा (सोलापूरकर) यांची एक पंढरपूरावर लिहिलेली प्रसिध्द लावणी आहे.त्यात ते पंढरपूरला, पांडुरंगपूर असे न म्हणता उमामहेश्वरपुरी असा स्पष्ट उल्लेख करतात

0 comments: